Farmhouse - 10 books and stories free download online pdf in Marathi

फार्महाउस - भाग १०

गण्याने जलद हालचाल केली . त्याने खिशात हात घातला . त्याच्या खिशात ते सूत होतं . त्याला कोणी दिलं ,  कोणी ठेवलं हे काही आठवत नव्हतं .  फक्त होतं . त्याने एक टोक शैलाकडे फेकलं , दुसरं स्वतःच्या हातात धरलं . त्याला तीन टोके होती .  जेव्हा शैला व गणेश दोघांनीही एकेक टोक धरले तेव्हा आपोआपच तिसरा टोक बप्पा कडे जाऊ लागले व त्यानी ते पकडलं....
     तेव्हाच तिला स्पर्शाची संवेदना जाणवली .  तिच्या हातात काही तरी होतं . तिने ते घट्ट पकडून ठेवलं .  हळूहळू सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना परतू लागल्या .  तिने डोळे उघडले .  तिच्या हातात सप्तरंगी सूत होतं .  त्या घनदाट अंधारात चमकणारं......

त्या सुताला तीन टोके होती व मध्यभागी वर्तुळाकार भाग होता .  एक टोक शैला हातात होतं ,  दुसऱ्या गाण्याच्या आणि तिसरे टोक बप्पाच्या हातात होतं ......

" शांत व्हा ,  मी सांगतोय शांता ह्वा ,  मनातील सर्व विचार काढून टाका .  तेच विचार करा जे गरजेचे आहेत ,या वेळेला गरजेचे आहेत ......"

   बप्पा धीर गंभीर आवाजात बोलत होते

एरवी त्या दोघांनाही विचारांना आवरणं शक्य नव्हतं  . पण ते सुत आणि बप्पाचा आवाज यामध्ये नक्कीच काहीतरी जादू  असली पाहिजे . कारण त्यांनी कधी विचारही न केलेल्या गोष्टी त्यांच्या विचारात येत होत्या त्यांनी कधी पाहिली नसतील अशी दृश्ये त्यांना दिसत होती . समोरचं दृश्य हळूहळू पालटत गेलं . ते  एका नव्या जागी पोहोचले......

स्वच्छ सूर्यप्रकाश प्रकाश , आजूबाजूला हिरवळ , सर्वत्र एक मंद सुगंध आणि हळूहळू वाहणारा मंद गार वारा. हा परिसर किती अल्हाददायक होता असं वाटत होतं की कायमसाठी इथेच राहावे पण काही क्षणासाठीच.....

  त्या तिघांनी एका वेगळ्या मितीत प्रवेश केला होता व त्या प्रवासाचे चालक होते स्वतः बाप्पा . बप्पानी त्यांना या ठिकाणी आणला होतं.....

" बाप्पा तुम्ही ...? "शैला म्हणाली

" सांगतो सारे काही सांगतो . पण आत्ताची वेळ बरोबर नाही .  आता संघर्षाची वेळ आहे . आपल्याला त्याच्या विरुद्ध तिघांना मिळून लढायचा आहे .  दोघही सावध व्हा .  आता आपला संघर्ष होणार आहे......

त्यांनी बाप्पाला वाईट व दुष्ट समजलं होतं बाबा खरं तर त्यांच्याच बाजूने लढत होते....

आजूबाजूचा परिसर दुरून बदलात येत होता . दुरून कोणीतरी येत होतं दुर्गंध काळोख घेऊन त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी.....

तोच तो हुकूम होता . ना त्याला आकार होता न कसलं शरीर होतं .  काळोखाची काळी छाया , त्याचबरोबर  , निराशा , क्रोध , भय वासना ,  सार्‍या नकारात्मक भावनांचा मिलाफ घेऊन तो आला होता....

ते तिघेही वर्तुळ करून बसले होते . बाप्पा पुन्हा एकदा म्हणाले " काहीही दिसो ,  काहीही होऊ , मी जरी येऊन म्हणालो तरीही हे सूत सोडू नका......

आजूबाजूचा परिसर पूर्ण पालटला . बाग बगीचा  फुलझाडे नि आल्हाददायक गारवा सारं काही नष्ट झालं .  सर्वत्र दुर्गंधी पसरली . झाडे वाळून कुजून गेली . वाळला पालापाचोळा सर्वत्र पसरला . हाडे गोठवून ठेवणारी थंडी वाजू लागली.....

" तुला काय वाटलं , तू मला हरवलं ,  मला फसवलंस.....?
  मी तुला पहिल्यांदाच ओळखलं होतं , जेव्हा तू माझ्याकडे आला होता माझा दास बनून माझा सेवक बनवून पण मी तुझा वापर करून घेतला . तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नव्हतं ....? तू काय करणार आहे मला माहीत नव्हतं .....? मला सारं माहीत होतं आणि आता तुझा शेवट होणार आहे......

आसमंतात एक भयानक किंकाळी घुमली . ती  बप्पाची होती   .  बाप्पाचे दोन्ही हात मनगटापासून तुटून बाजूला पडलज . त्याठिकाणी रक्ताचे पाट वाहू लागले . बप्पा च्या हातून ते सुत सुटलं होतं . त्यामुळे आता त्याला रोखणारी , थांबवणारी कोणतीच शक्ती त्याठिकाणी अस्तित्वात नव्हती  .  बप्पा वेदनेने विव्हळत होते ,  ओरडत होते  . दोघांचेही मनोधैर्य खचत चालले होते तरीही दोघांनीही ते सूत सोडले नव्हते . सुताची दोन टोके ते दोघेही धरून बसले होते । त्यांच्यापासून काही फुटांच्या अंतरावर बाप्पा व त्यांचे दोन मनगटापासून तुटून पडलेले हात अस्ताव्यस्त पडले होते . समोरचे दृश्य अधिकाधिक किळसवाणे होत चालले होते त्यांच्या हातातून रक्ताचा स्राव थांबत नव्हता . तो रक्ताचा स्राव कसेही करून थांबवायला हवा होता . अन्यथा पप्पांचा मृत्यू फार दूर नव्हता .

गण्या तिथून उठला . तो विसरला बप्पांनी स्वतः सांगितले होते की काहीही झाले तरी तिथून उठू नको पण शेवटी गण्या तिथून उठलाच .  त्याने आपल्या शर्टाची बाही फाडत बापाच्या हाताला बांधली . तेव्हाच विकृत हास्याचा गडगडाट त्याठिकाणी ऐकू येऊ लागला .

" आता मला अमरत्वाच्या मार्गापासून कोणीच रोखू शकत नाही..... " पुन्हा तेच विकृत हास्य.....

" सेवक तू तयार राहा भयंकर वेदनेसाठी . तू मला धोका दिला आहे तुझा मृत्यु इतका भयानक होणार आहे की साक्षात अघोर सुद्धा घाबरेल .....  दयेची भीक मागितली तरी मृत्यू देणार नाही .....अगणित काळासाठी वेदना व तडफडीच्या सागरात तुला जगावं लागेल.......

  आवाज हवेत  विरतो न विरतो , तोच पुन्हा बाप्पाची किंकाळी ऐकू आली . यावेळी बाप्पाचा हात कोपरापासून तुटला होता . दोन्हीही पायाची दहाच्या दहा बोटे इतस्ततः विखरून पडली होती.....

ते दृश्य किळसवाणे होते . शैला ओरडून बेशुद्ध झाली...... एवढ्या भयानक वेदना होत असूनही बप्पा बेशुद्ध होत नव्हते .  ते अजून जागे होते आणि एवढं रक्त जाऊनही त्यांचा मृत्यू होत नव्हता जणू तो हुकूम स्वतः बापाला बेशुद्ध होऊ देत नव्हता आणि मरूही देत नव्हता . सार्‍याच्या सार्‍या वेदना बप्पाला सोसाव्या लागत होत्या . त्या वेदनेमुळे बप्पाचा मेंदू बधीर झाला होता.  त्यांना काही सुचत नव्हते न काही कळत होते . ते फक्त ओरडत होते .  किंचाळत होते....

ते तिघे पूर्णपणे त्याच्या तावडीत सापडले होते . त्यांचा मृत्यू होणार होता आणि साधासुधा मृत्यू नाही ; तर वेदनेने परिपूर्ण असलेला  नरकातही अशा वेदना नसतील इतक्या भयानक वेदना त्यांना या ठिकाणी भोगाव्या लागणार होत्या....

शैला बेशुद्ध झाली होती . बाप्पा वेदनेने विव्हळत होते .  गण्याला कळना त्याला काय करावे.....?

बाप्पा विव्हळत -विव्हळत बारीक आवाजात अडखळत-अडखळत बोलत होते
" अरे गणेश माझ्या पिशवीमध्ये एक काचेची छोटीशी कुपी आहे . त्या कुपी मधील ते पवित्र जल तू या ठिकाणी शिंपड म्हणजे आपल्यासाठी नेहमीच्या जगात जाण्याचा मार्ग खुला होईल . या जगात मी त्याला आणले होते मला वाटले मी आपण त्याचा पराभव करु शकू ,  पण ते आता आपल्याला अशक्य आहे . आपण लवकरच जर नेहमीच्या जगात नाही गेलो तर आपल्या अंत निश्चित आहे....

गण्याने पिशवीकडे उडी घेतली तशा पिशवीतील सर्व वस्तू हवेत उडाल्या.... हवेतच उंचावरती ती काचेची कुपी होती . कितीही उड्या मारल्या तरी गणाच्या हाताला की कुपी यणं  कधीही शक्य नव्हतं..... त्याचवेळी बाप्पांनी कसल्या तरी विचित्र भाषेत विचित्र शब्द एकदम मोठ्या आवाजात उच्चारले आणि क्षणभरासाठी त्या हवेत उडालेल्या वस्तू जमिनीवरती स्थिर झाल्या . गण्याने ती काचेची कुपी पकडली  पण त्यामागोमाग बाप्पाचा तीव्र स्वरात किंचाळण्याचा आवाज त्यांच्या कानी आला व पुन्हा त्या सर्व वस्तू हवेत उडाल्या .

गण्या त्या कुपीचं  बुच काढून त्यातील ते पवित्र जल शिंपडण्याचा   बेतात होता . पुन्हा एकदा त्याच्या हातातून ती उडाली व काही अंतरावर जाऊन खळकन फुटली . पण त्यातील पवित्र जल खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच्या जगात जाण्यासाठी वाट खुली झाली होती...

पण त्या ठिकाणी गण्याला एकट्याला जायचे नव्हते दोघांनाही घेऊन जायचे होते . तो बाप्पाकडे वळला ,  पण बप्पाच म्हनाले  आधी शैलाला नेउन सोड.... गण्या शैला कडे वळला त्याने शहराला उचलले व तो चालू लागला...

हवेत रंगीत पाण्याचा फवारा उडावा त्याप्रमाणे नेहमीच्या जगातील म्हणजे ते काही वेळापूर्वी ज्या भुयारात होते त्याठिकाणचं एक दृश्य दिसत होतं... समोरची अजस्र विशाल मूर्ती होती . त्या मूर्तीच्या समोर बरोबर ती वाट खुली होत होती.... गण्या चालत निघाला पण या वेळी कोणताच प्रतिकार झाला नाही मागे बाप्पा तीव्र स्वरात मोठ्या आवाजात काहीतरी बडबडत होते.....

गण्या त्या भुयारात पोहोचला व मागे वळणार पण वाट बंद होऊ लागली होती पण आवाज येत होता त्या मूर्तीच्या हातामध्ये असलेल्या घाडग्यातील रक्त सांडून दे आणि दुसर्‍या घाडग्तील हाडे पाण्यात बुडवून टाक.......

ती वाट बंद झाली होती आणि बप्पांचा आवाजही म्हणजे बप्पा त्या ठिकाणीच राहिले होते . याचा अर्थ बप्पाचा मृत्यू निश्चित होता .  जे काही करायचे होते ते फक्त आता त्याला एकट्यालाच करावे लागणार होते . शैला तर बेशुद्ध होती . तो पटकन मूर्तीकडे वळाला...

मूर्तीचे हात जमिनीपासून आठ ते दहा फूट उंचीवर होते . त्या हातात जे गाडगं होतं ते त्याला खाली पाडायचं होतं .  तो पोलीस अगोदरच त्या हातापर्यंत पोहोचला होता .  पोलिसांबद्दल गण्या तर विसरलाच होता . त्या पोलिसाने ते गाडगे सांडून दिले .  ते गाडगे खळखळ आवाज करत फुटले .  त्यातील रक्त जमिनीवर सांडले . त्या मागोमाग भयंकर ओरडल्याचा , किंचाळण्याचा आवाज आला.  ते जे काही होतं ते नक्कीच चवताळलं होतं.....

तो पोलिस आठ दहा फुटांच्या उंचीवरून बेदमपने जमिनीवर आदळला गेला . त्याच्या डोक्याला मार लागला आणि तोही बेशुद्ध झाला . कसेही करून आता गण्याला त्याच्या दुसऱ्या हातातील गाड्यांमध्येही जी हाडे होती . ती पाण्यात टाकणे आवश्यक होते .....

पण सरळ सरळ त्या मूर्तीकडे तो आता पळत जाऊ शकत नव्हता कारण ते जे काही होते ते जागृत झालं होतं व त्यावर हल्ला करायचा प्रयत्न करणारच होतं .  त्याही अवस्थेत गण्याने जरा डोकं चालवलं व भुयारातून बाहेर जाण्याचा जो मार्ग होता त्या बाजूला तो पळत सुटला...... तो हुकुम चवताळला होता त्याला गण्याला मारायच होतं . तो घरातून बाहेर जाण्याच्या मर्गाकडे पळाला पण त्याने गण्याला बाहेर निसटू दिले नाही . गण्या   हवेत उडाला आणि जोरात विरुद्ध बाजूला येऊ लागला . त्याचा फायदा घेऊन गाण्याने आपले शरीर त्या मूर्तीच्या बाजूला झोकून दिले व तो मूर्ती वर जाऊन आदळला... तो पटकन मूर्तीच्या हाता पर्यंत पोहोचला व ते हातातील घाडगे घेऊन खाली आदळणार तेव्हा त्याच्या लक्षात आले त्याला तर ती हाडे पाण्यात टाकायची होती पण येथे पाणी कुठेच नव्हते....

आणि काय आश्चर्य भुयारात सर्वत्र पाण्याचे झरे लागावेत तसं पाणी भरलं गेलं.  गण्याने ती हाडे त्या पाण्यात टाकून दिली . हाडे पाण्यात पडतात न पडताच जोरात किंचाळल्या ओरडल्याचा आवाज येऊ लागला हळूहळू शांत झाला ......

ते जे काही होतं ते नष्ट झालं होतं पण ते पाणी आलं कुठून गण्या मनात विचार करत होता तेव्हाच आवाज आला

" जेव्हा कोणताही मनुष्य आपले अवजड शरीर  त्यागून जातो तेव्हा त्याच्याकडे निश्चितच  अधिक चेतना शक्ती जागृत होते कारण अवजड शहरांमध्ये तेच आत्मतत्व असते तरीही त्या चेतना जागृत होत नाहीत कारण त्याला जडाचे बंधन असते....

" बप्पा तुम्ही .....?

" जाता जाता तुम्हा दोघांना एकच सांगतो तुम्हाला अजून खूप शिकायचं आहे . तुम्हाला लवकरच कोणीतरी भेटेल जो तुम्हाला सारं काही सांगेल........

" पण बप्पा......."  गण्याला एक हुंदका दाटून आला शैलाच्याही डोळ्यातह आसवे गोळा झाली होती...

" रडू नका ....... बाप्पा चा आवाज आला . गाण्याच्या हुंदका  कुठल्याकुठे हरवला .शैलाच्या डोळ्यातली आसवेही विरून गेली.... काय आश्चर्य ते दोघेही रडायचे थांबले . बप्पा पुढे बोलू लागले....

" मी तुम्हा दोघांचीही माफी मागतो . मी तुम्हाला या माझ्या नियोजनाची पूर्वकल्पना द्यायला हवी होती . मी याच परंपरेचा पाईक असल्याचं त्याला दाखवत त्याच्या परंपरेत घुसलो होतो . त्याला कसेही करून मारायलाच हवा होते . पण ते मला एकट्याला शक्य नव्हतं म्हणून मी तुम्हा दोघांची वाट पाहत होतो . त्याची परंपरा फार वर्षांपासून चालत आलेली आहे . आता तुम्हा लोकांचा बळी गेला असता तर तो निश्चितच शक्तिशाली झाला असता . पण आपण तिघांनीही  त्याला रोखले ,  ते तुम्हा दोघा शिवाय कधीही शक्य नव्हते .

माझ्या उघड्या डोळ्यांनी मी गण्याची विटंबना पाहत होतो . जी विटंबना तो  अंजली च्या रूपात करत होता . माझ्या उघड्या डोळ्यांनी मी ती डायरी त्या गोगलगाय व ते सिरीयल किलींगचं  प्रकरण पाहत होतो . पण मी एकटा काहीच करू शकत नव्हतो . या सर्व गोष्टींच्या मागे तोच होता . त्याने त्या सर्व गोष्टी घडवल्या होत्या.

   फार पूर्वीपासून त्याची परंपरा चालत आलेली आहे . त्याने सुरुवातीला अमर व्हायचा प्रयत्न केला होता पण तेव्हा तो यशस्वी झाला नव्हता . मग त्याच्या साधकांकडे पिढ्यानपिढ्या त्याने हे प्रकार चालू ठेवले होते  . पण मला जेव्हा याविरोधात लढायची वेळ आली तेव्हा मी ती परंपराच बंद करून टाकली . मी एकाचा मृत्यू घडवून आणला व त्याच परंपरेचा पाईक असल्याचे दाखवत त्याच्या या खेळात सामील झालो . त्याच्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता......

नंतर मी तुम्हा दोघांची वाट पाहत होतो तुम्हा दोघांबाबत मला पूर्वकल्पना जाणिवा येत होत्या . जेव्हा मला तुझी जाणीव झाली तेव्हा मी मुद्दाहून तुझ्याबद्दल त्याला सांगितले . तेव्हाच त्याने तुला त्या अघोरी बेटावर येऊन वाचवले .....

पुन्हा एकदा सांगतो . तुम्हाला खूप शिकायचं आहे . तुमचं  आयुष्य आता पूर्वीसारखे राहिलेले नाही . तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून  गेलेलं आहे . त्याला कलाटणी मिळालेली आहे . त्याला परिसाचा स्पर्श झाला आहे . ते आता सोनं झालं आहे .

तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर असेच लढे द्यावे लागतील . तुमची निवड झालेली आहे.....

आणि एकाकी तो आवाज बंद झाला . त्या दोघांनाही या जगात दृष्टांविरुद्ध  लढण्याची जबाबदारी देऊन   . इतक्यावेळ वेळ ते शांत राहिलेले  दोघेही हुंदके देऊन रडू लागले.........

समाप्त