Farmhouse - 1 books and stories free download online pdf in Marathi

फार्महाउस - भाग १

फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे...

  # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .

$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर  अवश्य वाचा .....

【सारांश जत्रेचा 】
¢ गावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .
¢  तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे ,  अंजलीचे भूत   वाचवते .....
इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा .
 त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती

  " तू इथे काय करत होता ?
  " कशाला आला होता ?
"  तुझ्याबरोबर अजून कोण कोण होते ?
  " स्फोट कसा काय झाला ?

  आणि काय काय प्रश्न तो विचारत होता .
   गण्या त्याला काय सांगणार होता की तो त्याच्या मित्रांसोबत गावाच्या जत्रेला निघाला होता . काटेवाडीच्या जंगलातल्या वाटेने जाताना ते भुताच्या तावडीत सापडले .  त्यात त्याचे दोन मित्र त्याने गमावले आणि त्याला त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या भुताने वाचवलं . ज्या मैत्रिणीला त्याने लहान पणा नंतर कधी पाहिलंच नव्हतं . त्यालाच माहित नव्हतं की तो इथे कसा आला . तो पोलिसांना काय सांगणार होता  ?
तो फक्त म्हणाला
" मला माहित नाही ....
" माहित नाही काय .....? चल पोलीस स्टेशनला , दोन काठ्या पडल्या की सारं माहीत होईल....

"  मला खरच माहित नाही . मी खोटे का बोलेन ...

  आणि ते खरंच होतं .  पण तो काहीच करू शकत नव्हता गपचूप पोलिसांबरोबर जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नव्हता .

     माणसाच्या आयुष्यात काय होईल सांगता येत नाही .   काल रात्री गण्या जत्रेतला ऑर्केस्ट्रा पाहायला निघाला होता आणि आज तो तुरुंगात होता .  तरुंगात बसून त्यानं खूप डोकं चालवलं . त्याने खूप विचार केला की नक्की काय झालं असेल .  तो इथे कसा पोहोचला असेल . पण सारी खटपट व्यर्थ होती .  शेवटी वैतागून तो वेड्यासारखा इकडे तिकडे पाहत बसला .  त्याला बसल्या जागीहून पोलिसाचा टेबल दिसत होता . तेथे गाऱ्हाणं घेऊन येणारी माणसं दिसत होती . त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख ,  उदासीनता , क्वचित कधी राग आणि संताप सुद्धा दिसत होतं .  पण आत्ता आलेला इसम या साऱ्यांच्या विरुद्ध होता . त्याचा चेहरा हसरा होता . तो होताच थोडा विचित्र .

     काळ्याभोर झुपकेदार मिशा , पांढरे शुभ्र धोतर ,  त्यावर पांढरा सदरा  आणि काळा कोट . डोक्यावर जुने लोक घालतात तसे फेटा कम पगडी . तोंडात पानाचा तोबरा असल्यामुळे ओठ लाल झालेले . तो अर्धाभरतास त्या पोलिस अधिकाऱ्याबरोबर बोलत होता . मधून मधून गण्याकडे बोटही करत होता .  तो पोलिस अधिकारीही खुलून बोलत होता . मध्येच त्याने खिशातून पानाची चंची काढली पान तयार करून त्याने पोलिसालाही दिले आणि स्वतः खाल्ले .   शेवटी पोलिसांने गण्या कडे बोट करत काहीतरी सांगितले .  हवलदार चावी घेऊन त्याच्याकडे आला . त्याने गण्याला सोडवून बाहेर आणले .

तो पोलीस म्हणाला

"  बप्पा तुला सोडवायला आले म्हणजे काहीतरी खास असशील तू ....
" अजून काही मदत लागली तर सांगा बप्पा

" व्हय साहेब सांगतु की...  निघू का आता ..
     चला गणपतराव चला .

    गण्याला काहीच कळेना हा बप्पा कोण होता ? त्याने गण्याला का सोडवले ? आणि त्याला गाण्याचे नावही माहीत होते .  गण्या पुरता चक्रावला . जेव्हा पासून तो जंगलात घुसला होता , त्याचं आयुष्य म्हणजे धक्क्यांची मालिका झालं होतं .  धक्क्या मागून धक्के येत होते , त्याला सावरायलाही वेळ मिळत नव्हता .

" कुठं  हरवला गणपतराव येताय नव्हं ......

" पण मी ओळखलं नाही तुम्हाला ...?

" हुईल वळख हळूहळू आता चला माझ्यासंग

एरवीअनोळखी माणसाबरोबर तो गेलाच नसता पण ती वेळच अशी होती की तो गुपचूप त्याच्या बरोबर गेला ..
  सहा  खोल्यांचा मठ होता तो .  बप्पा म्हणाले होते हा आपल्या मठ .  2 बेडरूम , 1 किचन , एक हॉल व किचनला लागूनच जेवायची खोली होती .  बेडरूमही मोठ्या होत्या.  एका एका बेडरुममध्ये चार-चार बेड होते . म्हणजे खरच ही धर्मशाळा किंवा मठ असावा . त्याला टॉयलेट-बाथरूम दाखवून बप्पा जेवण आणायला बाहेर गेले

  गण्याने अंघोळ करून घेतली तेव्हा त्याला ताजतवानं वाटायला लागलं . बेडरूम मध्ये त्याच्या मापाचे कपडे ठेवलेच होते . त्याने ते बदलून घेतले व हॉल मध्ये येउन बसला . इतका वेळ त्याला विचार करायला वेळच मिळाला नव्हता . घटना इतक्या पटापट घडत गेल्या की त्याला प्रतिक्रिया द्यायला देखील वेळ मिळाला नाही . आता तो नव्या दमाने विचार करू लागला.  त्याला अंजलीने वाचवलं नंतर तो बेटावर होता .  तिथून पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलं .  तिथून बप्पाने त्याला सोडवून आणलं .

   ' हा बप्पा नक्की आहे तरी कोण ? आणि त्याला माझं नाव कसं माहित ?  महत्त्वाचं म्हणजे त्याला कळालं कसं की मी तुरुंगात आहे ? हा कसला मठ आहे नक्की ?  एक माणूस दिसत नाही . आपल्याला शोध घ्यायला पाहिजे . त्याने हॉलमधील टेबलाचा ड्रॉवर शोधायला सुरुवात केली .  त्याला पाहिजे ते काहीच सापडत नव्हते . ना कोणतं माहिती पत्र होतं ना कोणतं रजिस्टर . एकदम खालच्या कप्प्यात त्याला एक वही दिसली . त्या वही वरती एक कागद लावला होता .  त्याच्या वरती नाव होतं ^ गणपतराव ^ त्यांना पहिलं पान उघडून पाहिलं .

                      '  तिसरा शिलेदार '

व्हय तिसराच . आतापतुर दोन शिलेदार आलं  . गणपतराव तिसरा शिलेदार हाय . मागच्याबारीला पण अशीच सपनं पडली हुती .  ह्याबारीला जरा  जास्तीच  सपान  पडाया लागल्याती .

पहिल्या पानावरचा मजकूर येथेच संपला होता . दुसऱ्या पानावर मोठ्या अक्षरात एक आकडा टाकला होता .

                               ' १ '

किर्र जंगलात  तीन पोर जिवाच्या धास्तीने पळायल्यात आगीचा इस्फोट आणि दोघांचे मराण . एक जण वाचला त्यो पळतूय . पळता पळता एका समुद्राच्या बेटावर गेला .  परत स्फोट झाला . पुन्हा एकदा तो वाचला . आता तरूंगात बसलाय  . पोलीस स्टेशन वाटतय .

दुसऱ्या पानावरचा मजकूर इथेच संपला होता .

" तुला काय इचारायचं असेल तर मला इचार की इकडं-तिकडं  काय हुडकतुय " बाप्पा म्हणाले

सकाळी धोतर आणि कोटात बघितलेले बप्पा आता विजार आणि सुती बंडित ओळखू येत नव्हते .

" या वहीत काय आहे हे " गण्या म्हणाला

" तू वाचलीय ना . तुला कळालं न्हाय  का ?

" माझ्याबरोबर जे घडलं ते तुम्हाला कसं माहीत ?

" सांगतु आधी जेवण करू ,  मग सगळं सविस्तर सांगतु

   जेवण झाल्यावर ते दोघे हॉलमध्ये बसले बप्पांनी आपली पानाची चंची काढली पानाचा विढा तोंडात टाकून त्यांनी गाण्याला सारं सांगायला सुरुवात केली

     संघर्ष , लढाई सगळीकडे तेच चालू आहे . माणूस , प्राणी निसर्गातील सारे काही संघर्षच करत आहेत . अगदी किडा-मुंगी ,  छोट्यातला छोटा जीव मग तो  एकपेशीय का असेना ,  तो संघर्ष करतो . हा सारा संघर्ष चालला आहे तो स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी .  एकदा जीविताची हमी आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटला की सुरू होते वर्चस्वाची लढाई .  बऱ्याचदा वर्चस्वाची किंवा सत्तेची लढाई ही सामूहिकरीत्या लढली जाते . त्यात एक गट दुसर्‍या गटावर मात करण्याचा प्रयत्न करतो . हा संघर्ष मानवाला नवा नाही .  तो त्याच्या मनात पूर्वापार चालत आले आहे . त्याला या साऱ्यांची जाणीव आहे .

     हाच संघर्ष चालत आला आहे त्याच्या मनावर ती सत्ता मिळवण्यासाठी . हा संघर्ष चालत आला आहे त्या दोन शक्ती मध्ये ज्याला आपण सुर-असुर , दैवी-राक्षसी , मानवी-अमानवी ,  चांगली-वाईट , मंगलमय-अमंगलमय , पवित्र-अपवित्र म्हणतो .  आपण हेही जाणतो त्यापैकी दैवी , मानवी चांगल्या आणि मंगलमय गोष्टीने तो संघर्ष जिंकून मानवी मनावर वर्चस्व स्थापन केले आहे . पण अजूनही अमानवी , अघोरी शक्ती मानवी मनाच्या तळाशी दडून बसली आहे .  पावित्र्याची पकड ढिली झाली की ती अघोरी शक्ती आपलं अस्तित्व दाखवून देते . आपले शिलेदार बनवते व लढाई उभारते प्रस्थापितांविरोधात . मग त्यांच्या बरोबर दोन हात करण्यासाठी ती मंगलमय ,  पवित्र शक्ती मानवाला शिलेदार बनवून पुढे करते . मानवाला सामर्थ्य पुरवते.  पण शेवटी लढाई मानवालाच लढायची असते . बरेच जण ती जिंकतात , काही हरतात , काही धारातीर्थी पडतात तर काही शत्रूचे मांडलीकत्व  स्वीकारतात .

असा शिलेदार म्हणून गण्याची निवड झाली होती .

    बप्पाने असं काही सांगितलं की गण्याची बोबडीच वळली .  तो अन मांगल्याचा , पावित्र्याचा म्हणजेच साक्षात देवाचा शिलेदार .  हे शक्यच नव्हतं . हे खरं नाही . हे सारे घडत नाही . नक्कीच काहीतरी घोटाळा आहे .

" कसं काय तुम्ही असं म्हणताय .  मला काय येतंय.  मला निवडलं असतं तर मला कळालं असतं .  माझ्यात कोणतीच शक्ती नाही . ना मला उडता येते , ना मारामारी , ना माझं कशाचं प्रशिक्षण झालं .

" अरं येड्या तू स्वतःला सुपरहिरो समजायला का काय ?  तुला निवडलं हे नक्की . उद्यापस्न तू कामाला लागशील ते पण स्वतःहून तुला कुणी सांगायला लागणार नाही ..

    आणि बाप्पा निघून गेले . गण्या मात्र वादळाने उन्मळून पडलेल्या वृक्षाप्रमाणे सुन्न पडला .  आपली मुळं वर आली आहेत आणि पुन्हा ती रुजवायचे असतील तरी लवकर गाव गाठायला पाहिजे . असं वाटून तडक तेथून बाहेर पडला व गावाकडे निघाला . बप्पाने गण्याला  पाहिलं पण त्याने गण्याला हटकलं नाही कारण त्याला माहित होतं तो उद्या याच ठिकाणी माघारी आलेला असेल .

      तो सकाळी सकाळी आला.  आल्या आल्या बाप्पांची गचांडी धरून त्यांना मागे ढकलत चढ्या आवाजात बोलू लागला

"  ए थेरड्या सांग काय केलं तू . मला गावात कोणचं ओळखत नाही . अरे माझा बाप सुद्धा मला ओळखत नाही .  सांग काय केलं ? सांग नाहीतर ....

   असे म्हणत त्याने हाताची बुक्की उचलून बप्पांना मारणार तेवढ्यात बप्पाने त्याचा मानेला धरलेला हात उडवून लावला आणि दोन्ही हाताच्या मुठी ने त्याच्यावर प्रहार केला आणि गण्या कळवळत खाली कोसळला .

बाप्पाने इतकी जलद व चपळपणे हालचाल केली कि त्याच्या वयाच्यामानाने ती सर्वथैव अशक्य होती .

"  गणपतराव इथं मी काहीच करू शकत न्हाय .  सारं काही त्या शक्तीच्या मर्जीने हुतं . तिने तुमाला निवडलं .  तवा तुमाला हे करावंच लागणार दुसरा उपायच नाही तुमच्याकडं .....

निळ्याशार आकाशाखाली  एका झाडाच्या सावलीत ते दोघे बसले होते . गण्या आणि अंजली .

" तू माझ्या स्वप्नात का येते .....


" हे स्वप्न नाही

" तुला काही सांगायचं असेल तर सांगून टाक  उगाच सारखं सारखं स्वप्नात येऊन मला छळु नकोस

कधी नव्हे ते निर्विकार राहणाऱ्या अंजलीच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव उमटले . पण ते भितीचे भाव होते . आणि तेही क्षणभरासाठीच .

" माझ्यासोबत चल तुला काही तरी दाखवायचं आहे..

दोघेही चालू लागले . ते एका बंगल्याच्या गेट समोर येऊन पोहोचले . बंगल्यावरती लिहिलं होतं

                  `  _ _ व  फार्महाउस `

काहीतरी तीन अक्षरी नाव होतं पण दोन अक्षरे जागेला नव्हती .  गण्या गेट कडे जाऊ लागला

" जाऊ नकोस ..

" का ...?

" नको ...

असं म्हणून ती अंतर्धान पावली .  तिथून नाहीशी झाली .  तेव्हाच जोराचा पाऊस सुरू झाला. ढगांचा गडगडाटी आवाज येऊ लागला . त्याला असं वाटत होतं की ते ढग  गणपतराव-गणपतराव म्हणत होते .  हळू हळू आवाज वाढत गेले व स्पष्ट होत गेले

"  गणपतराव , ओ गणपतराव  डोळे उघडा . बरं झालं तुम्ही डोळे उघडलं .  मला वाटलं लईच मार पडला तुम्हाला त्याच्यामुळच बेशुद्ध झाला का काय तुम्ही ....?

" कशाला उठवलं बप्पा . अंजली मला एक घर दाखवत होती आत  चाललो होतो . पण तुम्ही उठवलं राव.....

"  घोटाळा झाला की मग गणपतराव .असू द्या आता . हातात काय हाय ?

त्यानं हात उघडला तसं सडलेल्या माणसाची दुर्गंधी नाकात शिरली .  त्याच्या हातात एक शिंपला होता . जसा गोगलगायीला असतो तसा .