तुम्ही महिला आहात म्हणून .....


मानव जातीत स्त्री आणि पुरुष फक्त ह्या दोन जाती आहेत....

माझे काही प्रश्न स्त्रियांसाठी ... जे मला स्त्रियानाच विचारावेसे वाटतात .

गळ्यात मंगळसूत्र घातल्याने म्हणजे तुमचा पती जिवंत आहे नाहीतर नाही ह्याचा अर्थ असा होतो काय ??

तुम्ही परंपरा समजून मंगळसूत्र घालता का ? की सौभाग्याचं लेणं म्हणून ....स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे

तिचं रक्षण होतं असं कुठे आहे भर दिवसा विवाहित स्त्रीच अपहरण बलात्कार होतोच आहे . मग शहर असो की खेडे

दिल्ली पासून गल्लली पर्यंत हे वावटळ थांबलेलं नाही ....

लग्नातच तुम्हाला जोडवे घातल्या जाते . भांगात कुंकू भरल्या जाते कधी लहानपणापासून न घातलेल्या बांगड्याचा भार सहन करावा लागतो . नवरा जिवंत असताना एखादी दिवस साधी कपाळावर टिकली जरी नाही लावली तरी हा समाज मागे कुरबुर करतो . सासू दातओठ खाते आपल्याच नावाने . आणि नवरा मरतो तेव्हा स्मशानातं त्याचा मृत्यू देह नेत नाही तर हाच समाज लग्नात जे संस्कृती म्हणा रितीरिवाजाच्या नावाखाली म्हणा जे काही बहाल करतो ते सारं काढून घेतल्या जाते . कपाळावरच कुंकू पुसल्या जातं हातातल्या बांगड्या काढून घेतल्या जाते एवढंच काय तर नवरा मेल्यावर हिरव्या बांगड्याचा चुडा ही त्या स्त्रीने कधी घालू नये . म्हणजे स्त्रीच्या सौन्दर्याची सारीच शान लयाला गेली . लावलीच कधी कपाळावर टिकली तर मग समाजच ओरडेल ..म्हणेल ," ह्या स्त्रीचा नवरा मेलाय आणि बघा हिला नाटण्या सावरण्याची आवड गेली नाही ..."

मग ह्या अश्या बंधनात तुमचं स्त्रीपण तुम्ही का विकावं ?

टिकली नाही लावली तरी नवरा तो नवरा असणारच आहे ..लावली तरी असणारच आहे राहाला प्रश्न तुमच्या सौन्दर्याचा नाही सौभाग्याचा प्रेम करता ना नवऱ्यावर तर तुमचं खरं सौभाग्य तोच आहे ..लग्न झाल्यावर पुरुर्षांचं कधी आडनाव बदल्या जाते का ? नाही ना ! तुम्ही का म्हणून आपलं वडिलांकडील आडनाव आहे ती ओळख मिटवून नवऱ्याचं आडनावं लावावं ? 

आज काल फॅड आलंय राव ...मुलांनाही कानात डूल कुरळ्या बारीक केसाची चुटी घालताना बघितलं . लेडीज ब्युटीपार्लर सारखे जेन्टस ब्युटीपार्लर वर जाऊन पुरुष मेकअप करू लागलेत ..मग त्यानेही बांगड्या घातल्या हातात तर बिघडलंय कुठे ??

- कोमल प्रकाश मानकर

Marathi Questions by Komal Mankar : 111056468

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now